तळवडे (ता. राजापूर) : चिपळूण येथील लेखक, पर्यटन, पर्यावरण, ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ते धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर यांना राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचा ‘अक्षरमित्र’ पुरस्कार रविवारी (दि. १२ फेब्रुवारी) प्रदान करण्यात येणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
तळवडे (ता. राजापूर) : चिपळूण येथील लेखक, पर्यटन, पर्यावरण, ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ते धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर यांना राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचा ‘अक्षरमित्र’ पुरस्कार रविवारी (दि. १२ फेब्रुवारी) प्रदान करण्यात येणार आहे.
तळवडे (ता. राजापूर) : येथे राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात चिपळूण येथील नामवंत कवी, बोलीभाषांचे अभ्यासक आणि समीक्षक अरुण गजानन इंगवले यांची विशेष मुलाखत शनिवारी (दि. ११ फेब्रुवारी) दुपारनंतरच्या ‘साहित्यविचार’ सत्रात पत्रकार-लेखक धीरज वाटेकर इंगवले यांची मुलाखत घेणार आहेत.
खेड : कोकणच्या प्राकृतिक सौंदर्याची कठोर काळजी घेणाऱ्या पर्यटन नियामक प्राधिकरणाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लेखक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.
चिपळूण : शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सहाव्या पर्यावरण संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता.
रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवरूखजवळच्या निगुडवाडीत पूर्वीच्या काळी गावकरी एकत्र येऊन गावात कोणतीही रोगराई येऊ नये यासाठी ग्रामदेवतांकडे आराधना करीत, प्रार्थना करीत, विनंती करीत. ती आराधना पद्धत आजही सुरू असून, या आगळ्यावेगळ्या परंपरेबद्दल शांताराम गोरुले यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या केळशी गावात हनुमान जयंतीला होणारा श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव आणि गणेशोत्सवात माहेरवाशीण गौराईला मानवंदना देण्यासाठी पेटलेला पलिता हाती घेऊन ढोल-सनईच्या तालावर श्रीकालभैरवाच्या साक्षीने रंगणारा सामूहिक पलित्यांचा नाच हे दोन्ही प्रकार आगळेवेगळे आहेत. चिपळूणमधील लेखक, पत्रकार धीरज वाटेकर यांनी त्याबद्दल लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.