‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने कोकणवासीयांना अंतर्मुख केले आहे. समर्थ कृपा प्रॉडक्शननिर्मित या लोकनाट्याचा ६००वा प्रयोग २३ एप्रिल २०२६ रोजी संगमेश्वरमधील गणेशआळी येथे रंगणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने कोकणवासीयांना अंतर्मुख केले आहे. समर्थ कृपा प्रॉडक्शननिर्मित या लोकनाट्याचा ६००वा प्रयोग २३ एप्रिल २०२६ रोजी संगमेश्वरमधील गणेशआळी येथे रंगणार आहे.
रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक लोककलांचे अस्सल संगमेश्वरी बोलीत विनोदी ढंगाने सादरीकरण करून अवघ्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या समर्थकृपा प्रॉडक्शन निर्मित लोकनाट्याने ५०० प्रयोगांचा टप्पा पार केला.
बोलीभाषांच्या अस्तित्वाबद्दल चिंतेचे सूर ऐकू येत असताना एखाद्या बोलीभाषेतील लोकनाट्याचे तब्बल ५०० प्रयोग होणे हा एक विक्रमच आहे. हे भाग्य कोकणातील संगमेश्वरी बोलीला लाभलं असून, ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हे त्या विक्रमी लोकनाट्याचं नाव आहे. अस्सल स्थानिक कलाकृती संस्कृतिवाहक कशी ठरू शकते आणि बोलीभाषेच्या पुनरुज्जीवनालाही कसा हातभार लावू शकते, हे या लोकनाट्याच्या उदाहरणावरून दिसतं. २३ मार्च २०२५ रोजी अडूर (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) इथे या लोकनाट्याचा ५००वा प्रयोग होत आहे. त्या निमित्ताने…
पहिल्या चार वर्षांच्या परिषदांमध्ये पर्यटनाचे पर्यटनाच्या विकासाचे अनेक मुद्दे मांडले गेले असले तरी पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र आले पाहिजे, रस्त्यांसारख्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, या विचारापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. यावर्षीची परिषद मात्र काहीशी वेगळी ठरली, असेच म्हणावे लागेल. कारण याच परिषदेत अनाहूतपणे मांडल्या गेलेल्या एका मुद्द्यावर एकदम एक कोटीच्या निधीची घोषणा झाली. तेच या परिषदेचे फलित होते.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने राजापूर तालुक्यातील तळवडे या गावी आठवे ग्रामीण साहित्य संमेलन भरविले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी बोलीभाषा टिकवून ठेवणे किती आवश्यक आहे, याबाबतचे विचार मांडले. बोलीभाषेतून स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडत असते. म्हणूनच बोलीभाषांचे संवर्धन म्हणजे स्थानिक संस्कृतीचे संवर्धनही असते.
मालवण : ‘मालवणी भाषा ही मने जोडणारी आणि भेदभाव संपवणारी गोड अशी बोलीभाषा आहे. कोकण किनारपट्टीवर अजूनही मराठीच्या चौदा बोलीभाषा आहेत; पण मालवणी भाषेच्या गोडव्याने आणि प्रेमळ आदरातिथ्य संस्काराने या भाषेचा झेंडा आज भाषानगरीत डौलाने फडकत आहे,’ असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश श्यामराव ठाकूर यांनी व्यक्त केले.