वसई-सावंतवाडी पॅसेंजरबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना आग्रही

वसई : वसई-सावंतवाडी पॅसेंजरबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना आग्रही झाली आहे. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा आग्रह व्यक्त झाला.

तिलारी जलविद्युत प्रकल्प विस्थापितांच्या न्यायासाठी झगडणार : शांताराम नाईक

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्याच्या सीमेवर वसलेल्या तिलारी जलविद्युत प्रकल्पातील बुडीत क्षेत्र विस्थापितांच्या न्यायासाठी झगडणार असल्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते शांताराम नाईक यांनी केला आहे.

आरोग्य सुविधांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण

सिंधुदुर्गनगरी : करोनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिघडलेली आरोग्याची परिस्थिती सुधारावी आणि इतर आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दिली.