कचरा आपण करायचा आणि त्याची विल्हेवाट सरकारने लावायची, असा नियमच होऊन गेल्यामुळे कचऱ्याने गंभीर रूप धारण केले आहे. ते सुधारले, तर देशात स्वच्छ राज्य म्हणून मिरवायला काहीतरी अर्थ राहील. नाहीतर लोकांनी ऑनलाइन दिलेल्या प्रतिक्रिया आणि तयार करून दिलेली स्वच्छतेची छायाचित्रे एवढ्या निकषावरच स्वच्छ शहरांची निवड करायची झाली, तर त्याद्वारे मिळालेली प्रमाणपत्रे जेथे लावली जातील, तेथेच खालच्या कोपऱ्यात कचराच कचरा असेल.