रत्नागिरीच्या किनाऱ्यावर ४६०० जणांनी केली स्वच्छता

रत्नागिरी : सागरी सीमा मंचाने आज आयोजित केलेल्या स्वच्छ सागर तट अभियानात रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर ४६०० जणांच्या समुदायाने स्वच्छता केली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, ठाण्याचे आमदार आमदार संजय केळकर आणि भारतीय तटरक्षक दल सी. ओ. शत्रुजित सिंग यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हयात १७ सप्टेंबरला ४७ किनाऱ्यांवर सफाई मोहीम

रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते अकरा या वेळेत रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ किनाऱ्यांवर एकाच वेळी सफाई मोहीम राबविण्यात येणार आहे.

गर्जा जयजयकार क्रांतीचा कीर्तनमालिकेतून जवानांसाठी २५ हजाराची मदत

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या (पावस, रत्नागिरी) आणि अखिल भारतीय कीर्तन कुलाच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने वर्षभर पार पडलेल्या गर्जा जयजयकार क्रांतीचा कीर्तनमालिकेतून जवानांसाठी २५ हजाराची मदत देण्यात आली.

वंदे मातरम् गीताविषयी रत्नागिरीत धनंजय चितळे यांचे व्याख्यान

रत्नागिरी : ‘स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस’ यांच्यातर्फे रत्नागिरीच्या अध्यात्म मंदिरात गेले दीड वर्ष सुरू असलेल्या मासिक व्याख्यानमालेत या वेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने वंदे मातरम् या गीताविषयी प्रवचनकार धनंजय चितळे विवेचन करणार आहेत. शनिवार-१३ ऑगस्ट, रविवार-१४ ऑगस्ट आणि सोमवार-१५ ऑगस्ट २०२२ असे तीन दिवस दररोज सायंकाळी पावणेसहा ते सव्वासात या वेळेत हे व्याख्यान होणार आहे.

सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचा लांज्यात ७ ऑगस्टला सत्कार

लांजा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत राष्ट्रभक्ती रुजविण्यासाठी लांजावासीयांनी पुढाकार घेतला असून भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचा लांज्यात भव्य सत्कार करण्यात येणार आहे.