धाराशिवचा उस्मानाबादपर्यंतचा प्रवास कसा आणि कधी झाला?

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील “उस्मानाबाद”चे “धाराशिव” असे नामांतर करण्यास मान्यता दिली आणि पुन्हा एकदा धाराशिव हे नाव चर्चेत आले. मुळात धाराशिवचा उस्मानाबादपर्यंतचा प्रवास कसा आणि कधी झाला, याची माहिती मनोरंजक आहे.

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत मंदारमाला प्रथम; ‘संगीत मल्लिका’ला दुसरा क्रमांक

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत मंदारमाला प्रथम; ‘संगीत मल्लिका’ला दुसरा क्रमांक

पावात घालून वडा खातात हेही माहीत नसलेली मुले!

वडापाव म्हणजे सर्वमान्य खाणे झाले आहे. पण वडापाव खाताना वडा पावात घालून एकत्र खातात, हेसुद्धा माहीत नसलेली मुले आपल्याच महाराष्ट्रात राहतात. कर्णेश्वर (ता. संगमेश्वर) येथे आलेल्या अशा मुलांच्या सहलीच्या निमित्ताने ….

माणगावच्या श्री देवी यक्षिणी वर्धापनदिनानिमित्त १२-१३ फेब्रुवारीला विशेष कार्यक्रम

माणगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव हे दत्तावतारी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांचे जन्मगाव. श्री देवी यक्षिणी ही माणगावची ग्रामदेवता. या श्री देवी यक्षिणीचा वर्धापनदिन सोहळा यंदा १२ आणि १३ फेब्रुवारी २०२३ (माघ कृष्ण सप्तमी आणि अष्टमी) रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

काळानुरूप बदल स्वीकारत लोककलांचे भवितव्य उज्ज्वल : डॉ. मुकुंद कुळे

चिपळूण : ‘नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. याउलट अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचीकता असते. काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या या लोककलांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत मुक्त पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी व्यक्त केले.

‘लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा अनमोल ठेवा जपायला हवा’

चिपळूण : ‘स्त्री गीते हे उपमांचे भांडार आहे; विधी, श्रम अणि खेळ या अनुषंगाने स्त्री गीतांमध्ये नृत्यही येते. ही गीते इतिहास, समाज, नाती-गोती याची महती सांगणारी असून, लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा हा अनमोल ठेवा जपायला हवा,’ असा सूर ‘लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती’ या परिसंवादातून उमटला.