एसटीने कोकणातून मुंबई-पुण्यासह राज्यभरात पाठवता येतील आंबे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने करोनाच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. २३ मे रोजी कोकणातील हापूस आंब्यांच्या १५० पेट्या घेऊन एसटीचा पहिला ट्रक बोरीवलीकडे रवाना झाला. दरम्यान, रत्नागिरीतून आज (२४ मे) मुंबईला आणि उद्या (२५ मे) पुण्याला एसटीचा मालट्रक आंबे घेऊन जाणार आहे.

रत्नागिरीत १३ नवे करोनाबाधित; एकूण संख्या १४५

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ मे) करोनाचे १३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता १४५वर पोहोचली आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती मिळाली.

रत्नागिरीत सहा जण करोनामुक्त; सिंधुदुर्गात आठ नवे रुग्ण; रत्नागिरीत १५ दिवसांत स्वॅब टेस्टिंग लॅब होणार

रत्नागिरी : रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज (२३ मे) सहा रुग्णांना उपचारांनंतर करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले. तसेच, आज मिरजमधून आलेले ११५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज रुग्णांमध्ये नवी वाढ झालेली नाही. रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात करोनाच्या निदानासाठी स्वॅब टेस्टिंग लॅब येत्या १५ दिवसांत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, तिचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ मे) आठ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी सात कोरोनाबाधितांची भर; संख्या १३२

रत्नागिरी : आज (२२ मे) रोजी मिरज येथून आलेल्या तपासणी अहवालांपैकी सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ४५५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३२ झाली आहे. त्यापैकी ९१ रुग्णांवर उपचार सुरू असून, ३७ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे ११ नवे रुग्ण आणि करोनाचा चौथा बळी; रुग्णसंख्या १२४वर

रत्नागिरी : २१ मे रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालांतील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी नऊ जण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत; मात्र दोन रुग्ण तपासणी करून आपापल्या घरी गेले असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी रात्री उशिरा दिली. त्यांना लवकरात लवकर शोधण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

२२ मेपासून रत्नागिरी जिल्ह्यात ५२ एसटी धावणार; रेल्वे आरक्षणही सुरू

रत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मेपासून शिथिलता जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ३२ मार्गांवर ५२ गाड्या २२ मेपासून धावणार आहेत. एसटीच्या विभागीय कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली. प्रवाशांच्या मागणीनुसार या गाड्या धावणार आहेत.