जिल्हा ग्रंथोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : दोन दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सवाला आज प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी उद्घाटन केले.

कोकण मीडिया दिवाळी अंकाला ना. सी. फडके पुरस्कार

मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ना. सी. फडके स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे.

‘… आणि अध्यक्षपद मिळण्याआधीच कृतार्थ झालो!’ : मधुभाईंची एक हृद्य आठवण

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा आज (१४ फेब्रुवारी २०२६) रत्नागिरीत नागरी सत्कार आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावरील एका विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील विवेक भावे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्याबद्दलची एक जुनी, हृद्य आठवण जागवली आहे. ती सोबत देत आहोत….

महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, भारताचा वैभवशाली इतिहास : धनंजय चितळे

‘महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, तर भारताचा वैभवशाली इतिहास आहे. नीतिमूल्यांपासून मनुष्यस्वभावापर्यंत, युद्धतंत्रापासून व्यवस्थापन कौशल्यापर्यंत आणि अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत सर्वच गोष्टींचे धडे आपल्याला यातून मिळतात. त्यामुळे हे धडे घेण्यासाठी मूळ महाभारताचे बारकाईने वाचन आणि त्यावर चिंतन आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांनी केले.

रत्नागिरीत २०-२१ डिसेंबरला “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” व्याख्यानमाला

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २० आणि २१ डिसेंबरला “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दोन्ही पुष्पे प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे गुंफणार आहेत.

हिंदी पहिलीपासून नको; पाचवीपासूनच असावी : रत्नागिरीकरांनी डॉ. नरेंद्र जाधवांसमोर मांडली मते

‘मराठी आणि इंग्रजी या भाषा पहिलीपासून आणि हिंदी पाचवीपासून शिकवण्याची सध्या सुरू असलेली पद्धतच कायम राहावी, असं मत रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर व्यक्त झालं,’ अशी माहिती त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज (३१ ऑक्टोबर) संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली.