हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी फटाके वाजवू नयेत, अशी हास्यास्पद सूचना देणारे लोकप्रतिनिधी याचा विचार कधी करणार आहेत? फटाके वाजवायला बंदी करण्यापेक्षा मुळातच फटाक्यांची निर्मितीच थांबविली गेली पाहिजे. फटाके तयारच झाले नाहीत, तर ते वाजविले जाणारच नाहीत. दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. आवाजाचा नव्हे, हे लोकमानसावर ठसले पाहिजे. प्रकाशाच्या, प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त दिवाळीसाठी शुभेच्छा!