फटाक्यांविना दिवाळी

हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी फटाके वाजवू नयेत, अशी हास्यास्पद सूचना देणारे लोकप्रतिनिधी याचा विचार कधी करणार आहेत? फटाके वाजवायला बंदी करण्यापेक्षा मुळातच फटाक्यांची निर्मितीच थांबविली गेली पाहिजे. फटाके तयारच झाले नाहीत, तर ते वाजविले जाणारच नाहीत. दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. आवाजाचा नव्हे, हे लोकमानसावर ठसले पाहिजे. प्रकाशाच्या, प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त दिवाळीसाठी शुभेच्छा!

कोकणाची स्मृतिचित्रे

‘आठवणीतलं कोकण’ या विशेषांकाबरोबरच ‘कोकण मीडिया’ने आठव्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘कोकण मीडिया’चा हा आठवा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. त्याचे कारण म्हणजे कोकणवासीयांनी जपलेल्या कोकणाविषयीच्या आठवणी त्या निमित्ताने संकलित करता आल्या. कोकणाविषयीची ही माहिती लिहिणारे स्मृतिवाहक, ती माहिती संकलित करून अंक प्रकाशित करण्यासाठी साह्यभूत ठरलेले जाहिरातदार, माहिती वाचणारे वाचक, अंकाचे वितरक या सान्यासह सर्वांनाच दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

कष्ट हीच जात, श्रमसंस्कृती हाच धर्म

आर्थिक उन्नती हेच आरक्षणाच्या मागणीचे प्रमुख उद्दिष्ट असेल तर श्रमांना प्रतिष्ठा देण्यासाठी याच नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत. त्यातून आरक्षणाचा मूळ मुद्दाच नाहीसा होऊ शकेल. पण याची सुरुवात कोणी करायची, हाच खरा प्रश्न आहे. तो सर्वच नेत्यांनी सोडविला तरच मार्ग निघणार आहे.

सातत्याचे दुर्लक्ष हेच कारण

मुंबई-गोवा महामार्गावरचा सर्वांत लांबीचा पूल उभारतानाच कोसळल्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औपचारिकतेपलीकडे जाऊन त्याचा विचार करायला हवा. रस्त्यामधल्या खड्ड्यांपेक्षा विकासकामे किती उभी केली आहेत, त्याकडे लक्ष द्यावे, असे पालकमंत्र्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. त्याची आठवण यानिमित्ताने झाली. पण रस्त्यांमधील खड्डे आणि कोसळणारे पूल यातून जीव वाचला, तरच त्या विकासाची फळे चाखता येणार आहेत, हेही लक्षात ठेवायला हवे.

पाचाचे पन्नास करताना …

रत्नागिरीत नुकत्याच सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशक्षमता शंभर विद्यार्थ्यांची असून आता प्रवेश घेतलेल्या शंभर विद्यार्थ्यांपैकी चार रत्नागिरी जिल्ह्यातले आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अशा कोकणातल्या पाच टक्के विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घेतला आहे. ही प्रवेश संख्या पन्नास टक्क्यांपर्यंत जावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी या समारंभात व्यक्त केली, ती योग्यच आहे. पण त्यासाठी अनेक मुद्दे विचारात घेतले जायला हवेत.

तासभर स्वच्छता, बाकी आनंदच!

वाहने सुरक्षितरीत्या चालविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या वाहतूक विभागाने आणि पोलिसांनी रस्त्यावरच्या मोकाट गुरांची जबाबदारीही स्वीकारलीच पाहिजे. ही समस्या कशी सोडवायची हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. तो त्यांनी सोडविला नाही, तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हे आणि तक्रारी दाखल झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही. या तक्रारी दाखल करण्याचे काम सर्वसामान्य वाहनचालक नागरिकांनी करायला हवे.