मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसमधून सध्या निम्म्या क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू होती. १८ सप्टेंबर २०२०पासून पूर्ण आसन क्षमतेने एसटी वाहतूक सुरू केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
Tag: अॅड. अनिल परब
२० ऑगस्टपासून एसटीच्या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार; नियम पाळणे बंधनकारक
मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेले पाच महिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची अर्थात एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
जिल्ह्याला नव्याने उभे करण्याचा संकल्प सर्वांनी करू या; स्वातंत्र्यदिनी रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. परब यांचे आवाहन
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आले. या आपत्तीच्या स्थितीतही शासन खंबीरपणे उभे आहे आणि या संकटावर मात करून जिल्ह्याला नव्याने उभे करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड अनिल परब यांनी आज (१५ ऑगस्ट) रत्नागिरीत केले.
चाकरमान्यांना सवलतीत एसटी उपलब्ध करून द्यावी : आमदार राजू पाटील यांची मागणी
कल्याण : गणेशोत्सवाकरिता मुंबई आणि परिसरातून कोकणासह राज्यभरात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात एसटीची बससेवा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन कल्याण ग्रामीण विभागाचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना कोकणवासीयांच्या वतीने दिले आहे.
एसटीने कोकणातून मुंबई-पुण्यासह राज्यभरात पाठवता येतील आंबे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने करोनाच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. २३ मे रोजी कोकणातील हापूस आंब्यांच्या १५० पेट्या घेऊन एसटीचा पहिला ट्रक बोरीवलीकडे रवाना झाला. दरम्यान, रत्नागिरीतून आज (२४ मे) मुंबईला आणि उद्या (२५ मे) पुण्याला एसटीचा मालट्रक आंबे घेऊन जाणार आहे.