कोकणातील वैभवशाली रंगभूमी – दशावतारी नाट्य

पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन! त्या निमित्ताने, दक्षिण कोकणातील वैभवशाली दशावतारी नाटक परंपरेवर प्रकाश टाकणारा, सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख!

जिल्हा परिषद आचरे उर्दू शाळेची आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड

आचरे : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातल्या आचरे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची सिंधुदुर्गातील एकमेव अल्पसंख्याक विभागातील आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड झाली आहे.

बॅ. नाथ पै : ओजस्वी वक्तृत्वाचे तेजस्वी दर्शन!

बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता २५ सप्टेंबर २०२२ रोजी होत आहे. कोकणी जनतेने आपल्या ह्या लाडक्या नेत्याला अनेक बिरुदांच्या आभूषणांनी भूषविले. अगदी ‘लोकशाहीचा कैवारी’पासून ‘अनाथांचा नाथ’पर्यंत एक ना अनेक; पण त्या सर्वांत ‘वक्ता दशसहस्रेषु’ हे आभूषण नाथ पैंना जिरेटोपासारखे शोभून दिसायचे. बालपणी बॅ. नाथ पै यांची अनेक रसाळ भाषणे ऐकण्याची सुवर्णसंधी ज्यांना प्राप्त झाली, ते आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी नाथ पै यांच्या अमोघ वक्तृत्वाबद्दल लिहिलेला सिंधुसाहित्यसरिता पुस्तकातील लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. तसेच नाथ पै यांची दशावतारी नाटकातील कलाकारांसंदर्भातील एक हृद्य आठवण ही लेखाच्या शेवटी दिलेल्या व्हिडिओत सांगितलेली आहे.

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे…; उर्दू शाळेतल्या प्रार्थनेने भारावले हवालदार

तसं पाहायला गेलं, तर हा प्रसंग खूप मोठा आहे असं नाही; पण आजच्या काळात सर्व प्रकारच्या अस्मिता टोकदार झाल्यामुळे द्वेषाची उदाहरणं अनेक ठिकाणी दिसत असताना संवेदनशीलता जागृत असेल, तर जगाला प्रेम अर्पण करण्याच्या धर्माचा विसर पडणार नाही, याची जाणीव यातून होते, एवढं मात्र नक्की.

आचऱ्यात साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

आचरा : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि मालवणचे बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बिडये विद्यामंदिर अर्थात केंद्रशाळा आचरे नं. १ येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या ‘जीवनयोगी साने गुरुजी’ या पुस्तकातील काही निवडक वेच्यांचे अभिवाचन केले.

बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मालवणमध्ये राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कोकणातील द्रष्टे नेते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाले आहे. त्यांच्या अनेक गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे अभ्यासू वक्तृत्व. म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘बॅ. नाथ पै करंडक २०२२’ ही राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.