रत्नागिरीत नवे ५६ करोना रुग्ण; एकूण संख्या १५५५

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ जुलै) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे २१ नवे रुग्ण सापडले. तसेच, आज रात्री साडेनऊ वाजल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, आणखी ३५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण ५६ रुग्णांची भर पडली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १५५५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३१९ झाली आहे.

‘आम्ही ‘असे’ करोनामुक्त झालो!’ – रत्नागिरी जिल्ह्यातील दाम्पत्याचा अनुभव

करोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पण सकारात्मक मानसिकता ठेवली, तर प्रत्यक्ष करोनाशी लढा देणे कठीण नाही. कसे, ते सांगणारा करोनामुक्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जोडप्याचा हा अनुभव.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १५२१वर; आज आणखी ३२ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २४) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे नवे ६१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४९९ झाली आहे. सिंधुदुर्गातील बाधितांची एकूण संख्या ३१३ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत ७४ नवे रुग्ण; एकूण बाधितांची संख्या १३३६

रत्नागिरी : आज (२१ जुलै) रात्री संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७४ नव्या करोनाबाधितांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या १३३६ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे सर्वाधिक १० मृत्यू दापोली तालुक्यात झाले असून, आतापर्यंत जिल्ह्यात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १२६२

रत्नागिरी : जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज (२० जुलै) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे ५२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२६२ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या २७९ झाली आहे.

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतून सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधाचा उद्देश कायम ठेवून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आठ ते १५ दिवसांच्या वास्तव्याबाबत शासनाने स्पष्ट निर्णय घेण्याची आणि नियोजन करण्याची चाकरमान्यांनी मागणी केल्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली; मात्र चाकरमान्यांचे विलगीकरण १४ दिवसांचे होणार की सात दिवसांचे, संस्थात्मक की गृह विलगीकरण याबाबत अद्यापही शासन आणि प्रशासनाने काहीही स्पष्ट केलेले नाही. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या आपल्या मूळ जिल्ह्यात उत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांबाबतचा कोणताच विषय पुढे आलेला नाही.