रत्नागिरी : करोनाच्या आजारातून आज जिल्ह्यातील ७३ जणांना बरे वाटले. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत ३३३३ जण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ६१.६१ टक्के आहे. आज नवे १४१ रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ५४०९ झाली आहे. सिंधुदुर्गात आज ८८ नवे रुग्ण सापडले.