रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ जुलै) एकाच दिवशी तिघा करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर नवे २१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीतील एकूण बाधितांची संख्या १०७० झाली असून, ३६८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्गातील एकूण बाधितांची संख्या २६५ झाली असून, २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्गात कोविड-१९ टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.