मुंबई, कोकणावर आता चक्रीवादळाचे संकट; चार जूनपर्यंत दक्षतेचा इशारा

रत्नागिरी : करोनाच्या संकटाने महाराष्ट्रात रौद्र रूप धारण केलेले असतानाच, मुंबई आणि कोकण किनारपट्टीकडे येत्या दोन दिवसांत चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे या भागांत अति वेगाने वारे वाहतील, तसेच, काही ठिकाणी अति-मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने आज (३१ मे) रात्री सव्वाआठ वाजता जाहीर केलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून, ‘एनडीआरएफ’चे जवानही तैनात केले जात आहेत.

कोकणात व्यावसायिक शेती करू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना व्यावसायिक शेतीसाठी मोफत मार्गदर्शन

देवरूख : करोनाच्या काळात मुंबई-पुणे येथून कोकणात आलेल्या तरुणांनी कोकणात व्यावसायिक शेतीचा प्रयोग करावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने केले आहे. त्यांना मोफत व्यावसायिक शेतीविषयक सल्ला देण्याची तयारी या समितीने दर्शविली आहे.

पावसाचे पाणी साठवण्याच्या किफायतशीर तंत्रांची माहिती ‘ई-बुक्स’मध्ये; पाणीवाले परांजपे यांचे लेखन

कोकणात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी काही प्रमाणात जरी साठवता आले, तरी कोकणातील काही गावांत मे महिन्याच्या अखेरीला जाणवत असलेली पाणीटंचाई दूर होऊ शकेल. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उल्हास मुकुंद परांजपे गेली १२-१५ वर्षे झटत आहेत. स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ अशा पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे तंत्र त्यांनी अनुभवातून सिद्ध केले आहे. या तंत्रांची माहिती देणारी त्यांची पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले-बुक्सवर प्रकाशित झाली आहेत.

एसटीने कोकणातून मुंबई-पुण्यासह राज्यभरात पाठवता येतील आंबे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने करोनाच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. २३ मे रोजी कोकणातील हापूस आंब्यांच्या १५० पेट्या घेऊन एसटीचा पहिला ट्रक बोरीवलीकडे रवाना झाला. दरम्यान, रत्नागिरीतून आज (२४ मे) मुंबईला आणि उद्या (२५ मे) पुण्याला एसटीचा मालट्रक आंबे घेऊन जाणार आहे.

‘शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाकडे सरकारचे दुर्लक्ष’

रत्नागिरी :  ‘गेल्या दोन महिन्यांत कोकणात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना स्वॅबच्या तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे. शिवसेनेला

मोफत एसटी प्रवासाबाबत दिशाभूल सुरूच…

मोफत एसटी प्रवासाबाबत परिवहन मंत्री म्हणजेच सरकार लोकांची दिशाभूल करत आहे!