रत्नागिरी : रामराज्याची घटना ठरणाऱ्या त्या साठ प्रश्नांच्या आधारे रामायणाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन संस्कृत भारतीचे कोकण प्रांताध्यक्ष सी. ए. चंद्रशेखर वझे यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रामराज्याची घटना ठरणाऱ्या त्या साठ प्रश्नांच्या आधारे रामायणाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन संस्कृत भारतीचे कोकण प्रांताध्यक्ष सी. ए. चंद्रशेखर वझे यांनी केले.
रत्नागिरी : रामायणात करुणा, विरह आहे. आध्यात्मिक, धार्मिक विचार त्यात नंतर आणण्यात आला आहे. काही हास्यप्रचुरते घटनाही दाखवल्या गेल्या आहेत. अशा गोष्टी मूळ वाल्मीकी रामायणात नाहीत. त्यामुळे रामायणाचा अभ्यास, संशोधनात्मक दृष्टीने केला पाहिजे, असे आवाहन संस्कृत भारतीचे कोकण प्रांताध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी केले.
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे उद्यापासून (दि. १७ फेब्रुवारी) दोन दिवसांची कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमाला होणार आहे. अज्ञात रामायण या विषयाची व्याख्याने त्यामध्ये होणार आहेत.
रत्नागिरी : ‘गीतेचे केवळ पाठांतर न करता त्यातील तत्त्वज्ञान आपलेसे करण्यासाठी गीताव्रती प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य व्यक्तीनेही गीतेतील तत्त्वज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावेत. सुख-दुःखामध्ये गुरफटून न जाता या दोन्ही बाबतीत साम्यावस्था आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’ असे प्रतिपादन निवृत्त प्राध्यापिका डॉ. नीला जोशी यांनी केले.