रायपाटणच्या शेतकरी समूहाचा एक हजार डझन हापूस आंबा एसटीतून औरंगाबादला

राजापूर : एसटीने आंब्याची वाहतूक सुरू केल्याचा फायदा रायपाटण (ता. राजापूर) येथील शेतकरी समूहाला झाला. मालवाहतुकीच्या एकाच ट्रकमधून साडेतीन टन म्हणजे एक हजार डझन हापूस आंबा सोमवारी (ता. २५ मे) थेट औरंगाबादला रवाना झाला.

रत्नागिरीत स्वॅब टेस्ट लॅब उभारण्याचा शासन निर्णय जारी; करोनाग्रस्तांमध्ये आज पाचने वाढ

रत्नागिरी : मिरज येथून आज (२५ मे) रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६१वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५५ रुग्णांना उपचारांनंतर पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करायला मान्यता देणारा शासन निर्णय राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज (२५ मे) जारी केला.

रत्नागिरीत बालरंगभूमी परिषदेतर्फे ऑनलाइन बाल-नाट्यकला स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीच्या बालरंगभूमी परिषदेने ऑनलाइन बाल-नाट्यकला स्पर्धा आयोजित केली आहे. लॉकडाउनच्या काळात घरात असलेल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी मुलांनी पाच ते सात मिनिटांच्या एकपात्री सादरीकरणाचे व्हिडिओ पाठवायचे आहेत. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत पाच जून २०२० आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर भातशेती; सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना ध्वनिचर्चासत्रातून मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : सध्या करोनाच्या संसर्गाचे संकट मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे; मात्र खरीप हंगाम जवळ येत असल्याने कोकणाच्या शेतीतील महत्त्वाचे पीक असलेल्या भाताच्या लागवडीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे खरीप भात लागवडीचे नियोजन, तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर शेती करताना घायची काळजी याविषयी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना नुकतेच ध्वनिचर्चासत्राद्वारे घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.

दिवसभरात रत्नागिरीत २४ आणि सिंधुदुर्गात एका रुग्णाची वाढ; रत्नागिरीची रुग्णसंख्या १५६

रत्नागिरी : आज (२४ मे) सायंकाळी मिरजमधून प्राप्त झालेल्या २७ अहवालांपैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता १५१वर पोहोचली आहे. आज (२४ मे) सकाळीच १३ रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत आज १९ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज एक नवा करोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

एसटीने कोकणातून मुंबई-पुण्यासह राज्यभरात पाठवता येतील आंबे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने करोनाच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. २३ मे रोजी कोकणातील हापूस आंब्यांच्या १५० पेट्या घेऊन एसटीचा पहिला ट्रक बोरीवलीकडे रवाना झाला. दरम्यान, रत्नागिरीतून आज (२४ मे) मुंबईला आणि उद्या (२५ मे) पुण्याला एसटीचा मालट्रक आंबे घेऊन जाणार आहे.