रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी वाटूळ (ता. राजापूर) ते दाभोळ (संगमेश्वर) राज्य मार्गावरील व्हेळ – विलवडे भाग (ता. लांजा) येथे वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी वाटूळ (ता. राजापूर) ते दाभोळ (संगमेश्वर) राज्य मार्गावरील व्हेळ – विलवडे भाग (ता. लांजा) येथे वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या १ ते ३ मार्च रोजी शिपोशी (ता. लांजा) येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रत्नागिरी : निर्मितीची साठ वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘मंदारमाला’ या विद्याधर गोखले लिखित संगीत नाटकाचे तीन प्रयोग कोकणात आजपासून (दि. ११ मे) होणार आहेत.
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या (मुंबई) मदतीकरिता वीररत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकाचे चार खेळ रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत.
जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी त्यातल्या त्यात योग्य कोणता, आपला लोकप्रतिनिधी ठरायला लायक उमेदवार कोणता, हे तरी मतदार नक्की ठरवू शकतो. आपणच मतदारांचे भाग्यविधाते आहोत, असे या प्रत्येक उमेदवाराने आतापर्यंत अनेकदा प्रचारातून सांगितले आहे. पण त्यातही खरोखरीच कोण भाग्यविधाता ठरू शकतो, याचा निर्णय मतदारांनाच घ्यावा लागणार आहे. ते त्यांनी ठरवायला हवे. आवर्जून मतदान करणे हाच तूर्त तरी त्यावरचा एकमेव उपाय आहे. तो योजायला हवा.
दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक विकासाचे अधिकाधिक चांगले टप्पे पार करण्याचे एक साधन असते, पण विकासाच्या या मुद्द्याकडे सारेच प्रमुख उमेदवार दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांच्या त्यांच्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेले असतात, पण तो एक उपचार असतो. विकासाचे मोठे स्वप्न त्या जाहीरनाम्यामध्ये छापले गेलेले असते. मी स्वतः काय करणार आहे, त्या जाहीरनाम्याच्या दृष्टिकोनातून माझी जबाबदारी कोणती आहे, मतदारांनी मी काय देऊ शकतो, राज्याच्या आणि देशाच्या भल्यासाठी मी काय करू शकतो हे सांगण्याकडे उमेदवार सोयीस्कर दुर्लक्ष करत असतात.