ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात लागू असलेले लॉकडाउन १५ जुलैपर्यंत जारी ठेवण्याचे आदेश अंशत: शिथिलता देऊन कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (आठ जुलै) जारी केले.
Tag: लॉकडाउन
लॉकडाउनला विरोध, तरीही रत्नागिरीतील बंद शांततेत
जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन एक जुलैपासून आठ दिवसांच्या कडक लॉकडाउनची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र लॉकडाउनची अंमलबजावणी काटेकोरपणाने सुरू झाली. पहिल्या दोन्ही दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातले सर्वच व्यवहार बंद होते.
रत्नागिरीतील आठ दिवसांच्या लॉकडाउनचे आदेश जारी; काय सुरू, काय बंद?
रत्नागिरी : करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, कोव्हिड-19 उपाययोजना आणि भारतीय दंड विधानातील कलम 144 नुसार ठोस उपाययोजना म्हणून
वाढीव वीजबिलासंबंधी ३० जूनला रत्नागिरीत विशेष ग्राहक मेळावा
मार्च, एप्रिल व मे या लॉकडाउन कालावधीमध्ये ग्राहकांचे मीटर रीडिंग झाले नसल्यामुळे जून महिन्यात वीजबिले जास्त आली आहेत. वीजबिलांसंबंधी वीज ग्राहकांच्या असलेल्या तक्रारी पाहता उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (३० जून) रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात विशेष ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एक जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाउन
रत्नागिरी : रत्नागिरीतील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन एक जुलैपासून रत्नागिरीत पुन्हा एकदा लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी, तसेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (२८ जून) रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केवळ पंधरा दिवसांनंतरच्या भविष्यासाठी
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १० एप्रिल २०२०च्या अंकाचे संपादकीय…