वासुदेव बळवंत फडके आणि चापेकर बंधू हुतात्मे झाले. लोकमान्य टिळकांचे त्यांना आशीर्वाद होते. त्यांच्या निधनानंतर क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. त्यांनी दिलेला `वंदे मातरम्`चा जयघोष ७४ वर्षांपूर्वी सुफळ झाला. आज पंचाहत्तरावा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करताना अशा ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक देशभक्तांना प्रणाम!