रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आले. या आपत्तीच्या स्थितीतही शासन खंबीरपणे उभे आहे आणि या संकटावर मात करून जिल्ह्याला नव्याने उभे करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड अनिल परब यांनी आज (१५ ऑगस्ट) रत्नागिरीत केले.
