स्वातंत्र्याचा पहिला दिवस : यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेली आठवण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाच्या आठवणीबद्दलच्या लेखाचा संपादित अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.

गर्जा जयजयकार क्रांतीचा कीर्तनमालिकेतून जवानांसाठी २५ हजाराची मदत

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या (पावस, रत्नागिरी) आणि अखिल भारतीय कीर्तन कुलाच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने वर्षभर पार पडलेल्या गर्जा जयजयकार क्रांतीचा कीर्तनमालिकेतून जवानांसाठी २५ हजाराची मदत देण्यात आली.

स्वराज्य भूमी अभिवादन यात्रेत भारतरत्न पां. वा. काणे यांना आदरांजली

दापोली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने स्वराज्य भूमी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने निघालेल्या स्वराज्य भूमी अभिवादन यात्रेत भारतरत्न पां. वा. काणे यांच्या स्मारकस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.

वंदे मातरम् गीताविषयी रत्नागिरीत धनंजय चितळे यांचे व्याख्यान

रत्नागिरी : ‘स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस’ यांच्यातर्फे रत्नागिरीच्या अध्यात्म मंदिरात गेले दीड वर्ष सुरू असलेल्या मासिक व्याख्यानमालेत या वेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने वंदे मातरम् या गीताविषयी प्रवचनकार धनंजय चितळे विवेचन करणार आहेत. शनिवार-१३ ऑगस्ट, रविवार-१४ ऑगस्ट आणि सोमवार-१५ ऑगस्ट २०२२ असे तीन दिवस दररोज सायंकाळी पावणेसहा ते सव्वासात या वेळेत हे व्याख्यान होणार आहे.

मुसळधार पावसामध्येही जनजागृती सायकल फेरी उत्साहात

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि लायन्स क्लबने घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी आज काढलेली सायकल फेरी मुसळधार पावसातही मोठ्या उत्साहात पार पडली.

खेडशीतील अंगणवाड्यांमध्ये विविध कार्यक्रम

खेडशी (ता. जि. रत्नागिरी) ग्रामपंचायतीअंतर्गत सर्व अंगणवाड्यांनी मिळून ५ ऑगस्ट २०२२ रोजी ‘कम्युनिटी बेस्ड इव्हेंट्स’ (CBE) अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन गयाळवाडी येथे केले होते.