रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्याप्रमाणेच उद्या (दि. २७ जुलै) जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्याप्रमाणेच उद्या (दि. २७ जुलै) जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी येत्या २५ तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी, २२ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राजापूर : राजापूर शहरातून अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा शहराला पडलेला वेढा काहीसा सैल झाला असला, तरी अद्यापही पूरस्थिती कायम आहे.
रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना गुरुवारी (दि. २० जुलै) जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. १९ जुलै रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या स्थितीनुसार, खेड शहरातील जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली असून, खेड शहरात मच्छी मार्केट भागात पुराचे पाणी भरले आहे.
चिपळूण : हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या इशाऱ्यानुसार मुसळधार वृष्टी सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. १९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या स्थितीनुसार, चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरातील नाईक कंपनी/मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी एक फूट पाणी भरलेले आहे.