रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिकाच्या अन्नप्रक्रिया उद्योगास मोठा वाव आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिकाच्या अन्नप्रक्रिया उद्योगास मोठा वाव आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी केले.
रत्नागिरी : दापोली तालुक्यावत मुरूड येथे अनधिकृतपणे रिसॉर्ट उभारणारे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्यावर कारवाई केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिला.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येणारे पर्यटक दोन-चार दिवसांसाठी राहिले, तर जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, हे लक्षात घेऊन पर्यटन धोरण आखले जाईल, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने आयोजित केलेल्या वारसा पर्यटन या विषयावरील तिसऱ्या शाश्वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मुंबई : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड सवलत योजनेला ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे सहा महिने बंद असलेली एसटीची रत्नागिरीतील शहर वाहतूक सेवा (सिटी बस) आज (२१ सप्टेंबर) सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ६५ फेऱ्या सोडण्यात आल्या.
रत्नागिरी : १८ सप्टेंबरपासून राज्यातील एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. रत्नागिरीतील शहर बस सेवा (सिटी बस) सोमवारपासून (२१ सप्टेंबर) सुरू होणार आहे. रत्नागिरी विभागाकडून ही माहिती देण्यात आली.