पळून चाललंय गाव, आचरे त्याचं नाव

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे इथली गावपळण १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. २०१९ सालानंतर यंदाचं वर्ष गावपळणीचं असल्याने प्रथेनुसार देवदिवाळीला श्री देव रामेश्वराचा कौल घेण्यात आला. त्यानंतर हे दिवस निश्चित झाले. गावातली सगळी मंडळी या काळात बाहेर जातात. आजच्या काळातही पाळल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथेबद्दल आचरे गावातले ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला लेख इथे प्रसिद्ध करत आहोत.

आचरे येथील केंद्रप्रमुख सुगंधा केदार गुरव सेवानिवृत्त; शिक्षकवर्गाकडून शुभेच्छा

आचरे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या सुगंधा केदार गुरव ३६ वर्षांहून अधिक वर्षांच्या सेवेनंतर ३१ मार्च २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्या निमित्ताने ‘केंद्र शाळा आचरे क्रमांक एक’ येथे शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वर्गाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.

साने गुरुजी कथामालेतर्फे आचरा येथे कथाकथन महोत्सव

मालवण : बँक ऑफ महाराष्ट्रची आचरे शाखा आणि साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेच्या संयुक्त विद्यमाने आचरे येथे मालवण तालुकास्तर कथाकथन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आमच्या नमशीचे भाऊमामा

आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक आणि ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचे मामा सदानंद काशिनाथ सामंत (नमस) यांना नुकतीच देवाज्ञा झाली. त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला, आजोळच्या समृद्ध आठवणी जागवणारा हा लेख…

आचरे गावातली रामनवमी… ‘पुलं’, कुमार गंधर्वांच्या सहभागाने पुलकित झालेली..

आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर मंदिरातील १९७५ सालचा रामनवमी उत्सव काही औरच होता. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व यांच्यासह महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ७० कलावंतांच्या सहभागामुळे तो त्रिशतसांवत्सरिक उत्सव अविस्मरणीय झाला. त्या उत्सवाच्या आठवणींबद्दल आचऱ्यातील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख…

मराठी संगीत रंगभूमीचा पहाडी सूर – भार्गवराम आचरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यवेड्या मालवण तालुक्याने तीन भार्गवराम मराठी रंगभूमीला दिले. भार्गवराम उर्फ मामा वरेरकर, भार्गवराम उर्फ मामा आचरेकर आणि भार्गवराम उर्फ दादा पांगे. २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिन. तसेच, भार्गवराम आचरेकर यांचा स्मृतिदिनही २७ मार्च. त्या निमित्ताने, मराठी संगीत रंगभूमीचा पहाडी सूर अशी ओळख असलेले भार्गवराम उर्फ मामा आचरेकर यांच्याबद्दल त्यांच्याच आचरा (मालवण) या गावातील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.