समाज घडविण्यामध्ये साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची : उत्तम कांबळे

राजापूर : डोक्याने चालतात ते जग बदलतात, मात्र पायाने चालतात ते जग बिघडवतात. त्यामुळे समाज घडविण्यामध्ये साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.

ओणी येथे मंगळवारपासून दोन दिवस कोमसापचे साहित्य संमेलन

राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे कोकण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस रंगणार्‍या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक जागर होणार आहे. या साहित्य संमेलनासाठी कवी केशवसुत साहित्य नगरी सज्ज झाली आहे.

कोमसाप राजापूर संमेलनाची ग्रंथदिंडीने वातावरणनिर्मिती

राजापूर : पारंपरिक ढोलताशाचा गजर आणि वाद्याच्या नादावर सादरीकरण करणारी लेझीम पथके यांनी सजलेल्या राजापूर शहर आणि ओणी बाजारपेठ परिसरामध्ये आज काढलेल्या ग्रंथदिंडीने ओणी (ता. राजापूर) येथे आयोजित केलेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाची उत्तम वातावरणनिर्मिती झाली.

सेवा दलाची पंचतत्त्वे घराघरात पोहोचावीत : शहाजीराव खानविलकर

राजापूर : सेवादलाची पंचतत्त्वे राष्ट्र सेवादल शिबिरार्थींच्या माध्यमातून घराघरात पोहोचावीत. त्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ओणी (ता. राजापूर) येथील नूतन विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक शहाजीराव भाऊराव खानविलकर यांनी मांडले.

ओणी येथे एप्रिलअखेर राष्ट्र सेवा दलाची दोन शिबिरे

राजापूर : राष्ट्र सेवा दलाच्या ओणी (ता. राजापूर) शाखेतर्फे दस्तनायक आणि समाजभान युवा अशी दोन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. येत्या २३ ते ३० एप्रिल या कालावधीत ही शिबिरे होणार आहेत.

करोनाने दीप्ती शेडेकरांना दाखवली स्वतःच्या पायावर उभे राहायची दिशा

राजापूर : करोनातील लॉकडाऊनने कळसवली (ता. राजापूर) येथील सौ. दीप्ती दिनेश शेडेकर या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने रोजगाराची नवी दिशा दिली. त्यातून तिने ओणी येथे जिद्दीने स्वतःचे सुपर मार्केट सुरू केले आहे.