कोमसापतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध स्पर्धा

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

कवितेची राजधानी मालगुंड झालं पुस्तकांचं गाव; थाटात लोकार्पण

कवितेची राजधानी अशी ओळख असलेलं मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) हे आता पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जाणार असून, त्याचा लोकार्पण सोहळा आज (२० एप्रिल २०२५) मोठ्या उत्साहात पार पडला.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सायकल रॅली काढून केले सावरकरांना अभिवादन

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी (२६ फेब्रुवारी) रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे लक्ष्मी चौक येथील वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिरगाव गायवाडी येथे वीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि दामले कुटुंबाने १०० वर्षे जतन करून ठेवलेल्या खोलीला भेट देण्यात आली. या दोन्ही उपक्रमांमध्ये क्लबमधील सायकलस्वार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बुधवारी ‘सागरा प्राण तळमळला’, गुरुवारी कवी कुसमाग्रज जयंती

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दोन दिवसांचा कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे.

पुस्तकांचे गाव – मालगुंड प्रकल्पाचे रविवारी उद्घाटन

रत्नागिरी : मालगुंड हे पुस्तकाचे गाव – आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे येत्या रविवारी (दि. २० एप्रिल) मालगुंड येथे उद्घाटन होणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२२-२३ सालचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यांचे वितरण १७ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे होणारआहे.