रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ३१) नव्या ५१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३९३२ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची एकूण संख्या १२८७ झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ३१) नव्या ५१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३९३२ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची एकूण संख्या १२८७ झाली आहे.
लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजेच ‘अनलॉक ४’च्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने आज (२९ ऑगस्ट) रात्री जाहीर केल्या. त्यानुसार, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्वीपेक्षा अधिक कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे; मात्र कंटेन्मेंट झोनमधील कडक निर्बंध सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरूच राहतील, असेही त्यात म्हटले आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ३०) नव्या ९४ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३१२२ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्या १५६ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२६५ झाली आहे.
मालवण : पाच सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात विविध स्थानिक लेखक आपल्याला घडविणाऱ्या शाळेच्या आणि शिक्षकांच्या स्मृती जागवणारे लेख लिहिणार आहेत. ही लेखमाला पाच सप्टेंबरपासून २० दिवस चालणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते नुकतेच या उपक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन झाले.
सावंतवाडी : करोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही लोकांकडून वारेमाप पैसे घेतले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील रुग्णवाहिकाचालक हेमंत वागळे या युवकाने मोफत अंत्यसंस्कार करण्याचा संकल्प केला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २९) नव्या ७१ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३७८७ झाली आहे. आज करोनामुळे तिघांच्या मृत्यूची नोंदही झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ११०९ झाली आहे.