पर्यावरण दिनानिमित्ताने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

खेड : अपेडे (ता. खेड) येथील कदम फाउंडेशनतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

चार दिवसांत अतिजोरदार पावसाची शक्यता, सावधगिरीचा इशारा

त्नागिरी : येत्या ११ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला.

कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’मधून कोसळला ट्रक; २० वर्षांतील पहिलाच अपघात

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर कोलाड ते केरळ मार्गावर धावणाऱ्या रो-रो वाहतुकीच्या गाडीतून आज (१८ नोव्हेंबर २०२०) पहाटे एक ट्रक कोसळला. अपघातात प्राणहानी झालेली नाही. कोसळणाऱ्या ट्रकच्या चालकाने उडी घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात तो जखमी झाला. रो-रो सेवा सुरू झाल्यापासून गेल्या वीस वर्षांतील अशा तऱ्हेचा हा पहिलाच अपघात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी; जनजीवन विस्कळित

रत्नागिरी : काल (तीन ऑगस्ट) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून, काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर शहरांना पुराचा वेढा बसला आहे.

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पोलादपूरजवळ दरड कोसळल्याने महामार्ग बंद

रत्नागिरी : गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने आज सायंकाळी (नऊ जुलै) धोक्याची पातळी ओलांडली. आज सकाळपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाला असल्याने खेड शहराजवळून वाहणाऱ्या या नदीच्या पुरात वाढ झाली. खेड शहराच्या दुसऱ्या बाजूने वाहणाऱ्या नारिंगी नदीच्या पाण्यातही वाढ झाली असल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलादपूरजवळ दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे.