ध्यास : गाव जगवण्याचा, जागवण्याचा

जुन्या आणि चांगल्या प्रथा-परंपरांचे जतन करणे, सध्याच्या काळात चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे आणि उद्याच्या पिढीसाठी उत्तम विचारांचे बीजारोपण करणे हे उद्दिष्ट राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने गेल्या आठ ग्रामीण साहित्य संमेलनांपासून ब्रीद म्हणूनच अंगीकारले आहे. त्याचे प्रत्यंतर नुकत्याच शिपोशीत झालेल्या नवव्या संमेलनातही आले.

डॉ. तानाजीराव चोरगे यांना समाजरत्न पुरस्कार

रत्नागिरी : ज्येष्ठ साहित्यिक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला

प्रसाद कुलकर्णींच्या आनंद यात्रेने साहित्य संमेलनात ऊर्जा

डॉ. वि. शं. चौघुले नगरी (प्रभानवल्ली, ता. लांजा) : गावी सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या विविधांगी कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या आनंद यात्रा या कार्यक्रमातून नर्म विनोदाची पखरण करत वि. शं. चौघुले साहित्यनगरी सकारात्मक ऊर्जेने भारून टाकली.

ऐतिहासिक प्रभानवल्ली गावात रंगले ग्रामीण साहित्य संमेलन

डॉ. वि. शं. चौघुले नगरी (प्रभानवल्ली, ता. लांजा) : मायमराठी भाषेचा गौरवदिन एका आठवड्यावर येऊन ठेपला असताना, विशाळगडाच्या पायथ्याशी, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या मुचकुंदी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावी अडीच दिवसांचा अक्षरमेळा भरला.

चित्रकार बाळ ठाकूर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार

लांजा : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेतर्फे येत्या १८ ते २० फेब्रुवारी याकाळात होणाऱ्या सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात भांबेड येथील जगप्रसिद्ध चित्रकार बाळ ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.

ऐतिहासिक प्रभानवल्लीत फेब्रुवारीत होणार सातवे ग्रामीण साहित्य संमेलन

लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे सातवे ग्रामीण साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रभानवल्ली (ता. लांजा) या ऐतिहासिक गावी होणार आहे. संघातर्फे होणारे हे सातवे ग्रामीण साहित्य संमेलन आहे.