शेवग्याच्या पानांचे लाडू, अळूच्या देठाचे बोंबिल फ्राय, रानभाजी पराठा-कढीपत्ता चटणी हे पदार्थ ठरले जिल्हास्तरीय रानभाज्या पाककला स्पर्धेत विजेते

जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवात घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी रानभाज्यांच्या अनेक कल्पक पाककृती सादर केल्या होत्या. पूजा सुरेश भुवड यांना रानभाजी पराठा-कढीपत्ता चटणी या पाककृतीसाठी पहिला क्रमांक मिळाला. अनन्या अक्षय खानविलकर यांनी केलेली अळूच्या देठाचे बोंबिल फ्राय (प्युअर व्हेज) ही पाककृती दुसऱ्या क्रमांकासाठी निवडली गेली. शर्मिली विनय गांगण यांनी केलेले शेवग्याच्या पानांचे लाडू तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.

सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात; म्हणूनच सायबर संस्कार या १७व्या संस्काराची गरज : डॉ. अक्षय फाटक

समाजात आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यांचे प्रकारही वेगवेगळे आहेत; मात्र सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले, तर हे गुन्हे घडणार नाहीत. म्हणूनच आजच्या युगात सायबर संस्कार या १७व्या संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षय फाटक यांनी केले.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे काम आपण सर्वांनी पुढे घेऊन जाऊ या : प्रमोद कोनकर

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचा चौथा स्थापना दिन (२ ऑगस्ट) साजरा झाला.

रुग्णवाहिकेला फोन गेल्यावर पाऊण तासात उपचार सुरू व्हायला हवेत : डॉ. उदय सामंत

मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या धर्तीवर पेपरलेस कार्यप्रणाली राबवण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्याचा, सर्व विभागांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज बैठकीत केली.

बेघर निवारा केंद्रे उभारण्याची वेळ न येण्यासाठी आत्मचिंतनाची गरज; केंद्राच्या उद्घाटनावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा

रत्नागिरी नगर परिषदेच्या आधार नागरी बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन आज (२१ जुलै) पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

शिक्षकांनी शिल्पकार बनून विद्यार्थ्यांची संस्काररूपी मूर्ती घडवावी : डॉ. उदय सामंत

शिक्षकांनी शिल्पकार बनून विद्यार्थ्यांची संस्काररूपी मूर्ती घडवली पाहिजे, असे विचार रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडले. रत्नागिरीतल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये झालेल्या ‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ या विशेष कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत बोलत होते.