शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे उदय सामंत यांचे निर्देश

बँकेचे शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोअरची मागणी करत असतील, तर अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे निर्देश रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (२८ जून) संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

केबीबीएफच्या उद्योजकांनी दावोसमध्येही करार करण्याचे उद्दिष्ट ठेवावे : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

कऱ्हाडे ब्राह्मण बेनव्होलंट फाउंडेशनने (केबीबीएफ) आयोजित केलेल्या ग्लोबल मीटमध्ये आलेल्या उद्योजकांनी दावोस येथेही सामंजस्य करार करावा, असे उद्दिष्ट ठेवावे. म्हणजे खऱ्या अर्थाने ग्लोबल मीटचा उद्देश साध्य होईल. तसेच ही ग्लोबल मीट मराठी उद्योजकांचे आयडॉल लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंतीदिनी म्हणजे २० जून रोजी मराठी उद्योजकता दिनी दरवर्षी आयोजित करावी, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जगात कुठेही झाले नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात : डॉ. उदय सामंत

‘पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जगात कुठेही झालं नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात होत आहे. आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतंय, याचा पालकांना अभिमान असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून माझ्यासारख्या अनेकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे,’ असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.

कोकणात गटशेती होण्याची गरज : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरीत प्रतिपादन

‘कोकणात भरपूर क्षमता आहे. कोकणातलं शेतीक्षेत्र छोटं आहे. म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांना गटशेतीकडे वळवलं पाहिजे. त्यातून शेतीमालाचा ब्रँड तयार होतो आणि विपणन सोपं होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. म्हणूनच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे. शेतकरी अन्नदाता आहे. त्याला कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे. तरच शेतकरी समृद्ध होईल. इथे उदरनिर्वाह होत नाही म्हणून इथला तरुण बाहेर जातो. त्याला रोजगार इथेच मिळाला पाहिजे, असं नियोजन केलं पाहिजे,’ असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केलं.

कर्करोगाचे मोफत निदान करणाऱ्या व्हॅनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; महिनाभर चालणार मोहीम

कर्करोगाचे निदान करणारे फिरते रुग्णालय म्हणजेच कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनचे लोकार्पण आज (२४ मे) रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या फिरत्या रुग्णालयाद्वारे कर्करोग तपासणीची मोहीम महिनाभर चालणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरी हाउसबोट जांभारी बंदरात

महिला प्रभागसंघांतर्फे चालवल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दुसऱ्या हाउसबोटीचं लोकार्पण आज (१८ मे) पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी तालुक्यातल्या जांभारी बंदरात झालं.