समाजाच्या नवनिर्मितीसाठी पूरक साहित्यनिर्मिती हवी : अ‍ॅड. सुभाष लांडे

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : साहित्याची निर्मिती करताना केवळ करमणूक करणारे साहित्य अपेक्षित नसून समाजाच्या नवनिर्मितीसाठी पूरक असलेल्या साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी व्यक्त केली.

हिंदूराष्ट्र म्हणजे भारतातील नवफॅसिझम – डॉ. भालचंद्र मुणगेकर

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : हिंदूराष्ट्र हा भारतातील नवफॅसिझमचा आविष्कार आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी रत्नागिरीत भरलेल्या पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनात व्यक्त केला.

ठाण्यात ११, १२ जानेवारीला कोमसापचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन

ठाणे : गेली सुमारे तीन दशके साहित्य व्यवहारात आपल्या साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांनी आगळा ठसा उमटविलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती समितीद्वारे दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ११ आणि १२ जानेवारीला ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हे संमेलन पार पडणार आहे.

ग्रामीण भागातील साहित्यनिर्मितीला कोमसापचा आधार – डॉ. मुणगेकर

रत्नागिरी : ग्रामीण भागात उत्तम साहित्यनिर्मिती होत असून त्याकरिता कोकण मराठी साहित्य परिषद हा मोठा आधार आहे. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही साहित्य परिषदांपेक्षा हे वेगळेपण आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी नमिता कीर

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष सौ. नमिता कीर यांची, तर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी खासदार, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची निवड करण्यात आली आहे.