रत्नागिरी : देशातील अनेक राज्यांतून अगदी महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून उद्योग उभारणीसाठी महिला, तरुण-तरुणी भेटत असतात, मात्र कोकणातील दोन्ही जिल्ह्यात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.