पत्रकारपुळका नावापुरताच

अलीकडे नेत्यांना आपल्यावर झालेली टीका अजिबात सहन होईनाशी झाली आहे. देशातील अनेक राज्यांसह मुंबईतील काही पत्रकारांना याचा त्रास भोगावा लागला आहे. आता ते लोण रत्नागिरी जिल्ह्यातही येऊन ठेपले आहे. काही प्रमाणात यूट्यूब चॅनेलमधून विरोधी पक्षाची भूमिका पत्रकार निभावत असतात. त्यांची संख्या अगदीच नगण्य असली, तरी ते अंधारातल्या पणतीचे काम करून समाजाला प्रकाश दाखविण्याचे काम करतात. त्यांचा आवाज क्षीण असला, तरी ते आपले काम नेटाने करत असतात. मात्र त्याचाही नेत्यांना त्रास होत असतो.

पत्रकारितेची दीनता

तंत्रज्ञानातील पत्रकारितेला आवश्यक मूलभूत सोयीसुविधांसाठी आर्थिक पाठबळ असावे लागते. त्यामुळे व्यावसायिकीकरणाला पर्याय नाही. परिणामी इष्ट तेच छापणार या बोधवाक्याशी फारकत घेऊन जे विकेल, तेच छापणार किंवा जे वाचले जाईल, तेच लिहिणार, प्रसारित करणार असे पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे.

ग्रामीण भारतात प्रजासत्ताक आहे?

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २८ जानेवारीच्या अंकाचे संपादकीय

पत्रकारांनी पारदर्शक समाजाभिमुख पत्रकारितेचा विशुद्ध ध्वज हाती घ्यावा : गंगाराम गवाणकर

लांजा : ‘बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलली असली, तरी सर्वसमावेशकता व तळागाळातील जनतेचे प्रश्‍न मांडणे हा पत्रकारितेचा गाभा आजदेखील कायम असून, यासाठीच पत्रकारांनी पारदर्शक असले पाहिजे,’ असे मत सुप्रसिद्ध नाटककार ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.