निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांची उदासीनता

उद्योजक महोत्सवाच्या बाबतीतही तेच झाले. एवढा मोठा महोत्सव भरला. पण त्यावर झालेला प्रचंड खर्च लक्षात घेता त्या तुलनेमध्ये उद्योजकांनी महोत्सवात भाग घेतल्याचे दिसले नाही. रिकाम्या खुर्च्यांसमोर कार्यशाळांचे कामकाज सुरू होते. या योजना ज्यांच्यासाठी आहेत, त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचायला हवे होते. पण तसे झाल्याचे दिसले नाही. केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे घडले. केंद्रात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री लोकाभिमुख प्रशासनासाठी कितीही कंठशोष करत असले तरी निर्ढावलेले अधिकारी-कर्मचारी स्वतःमध्ये कोणताही बदल घडवत नाहीत. लोकांशी त्यांना देणेघेणेच नसते, हेच यामधून पुन्हा एकदा समोर आले आहे.

रिफायनरी-एमएसएमई एकत्र आल्यास विकासाचा अनुशेष भरेल : राणे

रत्नागिरी : देशातील अनेक राज्यांतून अगदी महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून उद्योग उभारणीसाठी महिला, तरुण-तरुणी भेटत असतात, मात्र कोकणातील दोन्ही जिल्ह्यात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

उद्योजकतेला कोकणातून प्रतिसाद मिळत नाही याची खंत : नारायण राणे

रत्नागिरी : देशातील अनेक राज्यांतून अगदी महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून उद्योग उभारणीसाठी महिला, तरुण-तरुणी भेटत असतात, मात्र कोकणातील दोन्ही जिल्ह्यात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचे नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १९ फेब्रुवारी) होणार आहे.

रत्नागिरीत १९-२० फेब्रुवारीला रत्नागिरी औद्योगिक महोत्सव

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या १९ आणि २० फेब्रुवारीला रत्नागिरी औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन आहे.