कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार रामचंद्र वालावलकर यांना प्रदान

माडखोल, सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांना ‘अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण’चा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार नुकताच माडखोल केंद्रशाळेत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

रापण : कोकण किनारपट्टीचे सांस्कृतिक लेणे

सागराचे सान्निध्य लाभल्याने उकडा भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी. मग माशांचा प्रकार काहीही असो, कोकणी माणूस प्रत्येकाच्या आगळ्यावेगळ्या चवीला मानाचा मुजरा करून यथेच्छ उदरभरण करीत असतो. अर्थात मासे उड्या मारत ताटात कधीच येत नसतात. ते पकडण्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्यात रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच! त्याचा रुबाब, त्याची अदब, सारेच आगळे आणि वेगळे! अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या वेगळेपणापासून अर्थकारणापर्यंत आणि गीतांपासून नियमांपर्यंत अशा सर्व बाजूंची ओळख करून देणारा हा लेख… सुरेश ठाकूर यांच्या लेखणीतून…

कोकणातील वैभवशाली रंगभूमी – दशावतारी नाट्य

पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन! त्या निमित्ताने, दक्षिण कोकणातील वैभवशाली दशावतारी नाटक परंपरेवर प्रकाश टाकणारा, सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख!

जिल्हा परिषद आचरे उर्दू शाळेची आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड

आचरे : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातल्या आचरे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची सिंधुदुर्गातील एकमेव अल्पसंख्याक विभागातील आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड झाली आहे.

बॅ. नाथ पै : ओजस्वी वक्तृत्वाचे तेजस्वी दर्शन!

बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता २५ सप्टेंबर २०२२ रोजी होत आहे. कोकणी जनतेने आपल्या ह्या लाडक्या नेत्याला अनेक बिरुदांच्या आभूषणांनी भूषविले. अगदी ‘लोकशाहीचा कैवारी’पासून ‘अनाथांचा नाथ’पर्यंत एक ना अनेक; पण त्या सर्वांत ‘वक्ता दशसहस्रेषु’ हे आभूषण नाथ पैंना जिरेटोपासारखे शोभून दिसायचे. बालपणी बॅ. नाथ पै यांची अनेक रसाळ भाषणे ऐकण्याची सुवर्णसंधी ज्यांना प्राप्त झाली, ते आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी नाथ पै यांच्या अमोघ वक्तृत्वाबद्दल लिहिलेला सिंधुसाहित्यसरिता पुस्तकातील लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. तसेच नाथ पै यांची दशावतारी नाटकातील कलाकारांसंदर्भातील एक हृद्य आठवण ही लेखाच्या शेवटी दिलेल्या व्हिडिओत सांगितलेली आहे.

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे…; उर्दू शाळेतल्या प्रार्थनेने भारावले हवालदार

तसं पाहायला गेलं, तर हा प्रसंग खूप मोठा आहे असं नाही; पण आजच्या काळात सर्व प्रकारच्या अस्मिता टोकदार झाल्यामुळे द्वेषाची उदाहरणं अनेक ठिकाणी दिसत असताना संवेदनशीलता जागृत असेल, तर जगाला प्रेम अर्पण करण्याच्या धर्माचा विसर पडणार नाही, याची जाणीव यातून होते, एवढं मात्र नक्की.