स्वातंत्र्यावर मर्यादा हवी

लोकांनी आपल्या प्रतिनिधींना सभागृहामध्ये उपस्थित राहून काम करण्यासाठी निवडून दिलेले असते. सातत्याने सभात्याग करणे म्हणजे लोकांच्या मतांचा अनादर आणि त्यांच्याशी केलेली प्रतारणाच आहे. भलेही सरकारने मांडलेले मुद्दे पटत नसले, तरी त्यासाठी सभागृहातून बाहेर पडायलाच हवे असे नाही. किंबहुना लोकप्रतिनिधींनी सभागृहात उपस्थित राहणेच अत्यावश्यक आहे. ते सभागृहातील नियोजित कामकाजाच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वेळ सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, तर ती त्यांची अनुपस्थिती समजून खासदारकीच रद्द करण्याची तरतूद केली गेली पाहिजे.

गैरसोयींचे पारतंत्र्य

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या आढाव्यातील प्रत्येक बाबीचा ऊहापोह करणे शक्य आहे. पिण्याचे पाणी, कचरा, गटारे अशा सर्वसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविल्याचे चित्र त्यात दिसत नाही. कोट्यवधींचा खर्च होत असताना लाखाच्या किंवा केवळ काही हजारांच्या खर्चाच्या तरतुदीची अपेक्षा असणाऱ्या सुविधा दुर्लक्षित राहतात. किंबहुना हजार आणि लाखातल्या योजना आखायच्याच नाहीत, असे ठरवून टाकले असावे. त्यामुळे अशा समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारतीय स्वातंत्र्याचा उद्घोष करताना सर्वसामान्य जनता अशा छोट्या छोट्या गैरसोयींच्या पारतंत्र्यातून सुटकेची वाट पाहत असते.

स्वातंत्र्याचा पहिला दिवस : यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेली आठवण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाच्या आठवणीबद्दलच्या लेखाचा संपादित अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.

भारतीय ध्वजसंहिता – २००६

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जाणार आहे. त्या निमित्ताने, भारतीय ध्वजसंहिता येथे प्रसिद्ध करत आहोत. तिरंगा फडकवताना या संहितेत दिलेले मुद्दे आवर्जून लक्षात ठेवावेत आणि भारतीय तिरंगा ध्वजाचा मान राखावा.

रत्नागिरीत शुक्रवारी निर्यातदारांचे संमेलन, निर्यातविषयक सेवा, उत्पादनांचे प्रदर्शन

रत्नागिरी : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत निर्यातदारांचे संमेलन आणि रत्नागिरी जिल्हयातील निर्यात होणारी उत्पादने तसेच सेवांविषयीचे प्रदर्शन येत्या शुक्रवारी (२४ सप्टेंबर) रत्नागिरीत होणार आहे.

पहिल्या पाच क्रमांकांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राहील – उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा करताना पहिल्या पाच क्रमांकात जिल्ह्याचे नाव राहील अशा पद्धतीने काम करू या, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.