शेतकऱ्यांसाठी योग्य सल्ला

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक करणारे जसे आहेत, तसे त्यांच्यावर टीका करणारेही आहेत. अलीकडेच त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सल्ल्यावरून मोठी टीका होत आहे. गडकरी यांच्या या वक्तव्यामध्ये काहीही अयोग्य आणि चुकीचे नाही.

सिंधुदुर्गातून हापूसची पहिली पेटी मुंबईला रवाना

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार शंकर नाणेरकर यांच्या पाच डझनी आंब्याच्या दोन पेट्या नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी रवाना झाल्या आहेत. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची पेटी पहिली पाठविण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.

कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कणकवलीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर फेरी

कणकवली : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. तसा संदेश संपूर्ण कोकणासह देशभर जाऊ द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ कार्यक्रमात शहापूरच्या महिलेचा संवाद

ठाणे : गटशेती करीत असल्यामुळे सिंचनाची व्यवस्था झाली. त्यामुळे गेल्या वर्षी भेंडी, मिरची गवार भाजीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले. याशिवाय ट्रक्टर आणि शेततळ्याचा लाभ झाल्याचे शहापूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी जानकी तुकाराम बगळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘विकेल ते पिकेल’ या कृषी विभागाच्या ऑनलाइन कार्यक्रमात संवाद साधून स्पष्ट केले.

‘विकेल ते पिकेल’ या धोरणावर मुख्यमंत्र्यांचा आज १२.३० वाजता शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कृषिविषयक योजनांच्या संदर्भात गुरुवार, १० सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत शेतकऱ्यांशी ऑानलाइन संवाद साधणार आहेत.

कोकणात व्यावसायिक शेती करू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना व्यावसायिक शेतीसाठी मोफत मार्गदर्शन

देवरूख : करोनाच्या काळात मुंबई-पुणे येथून कोकणात आलेल्या तरुणांनी कोकणात व्यावसायिक शेतीचा प्रयोग करावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने केले आहे. त्यांना मोफत व्यावसायिक शेतीविषयक सल्ला देण्याची तयारी या समितीने दर्शविली आहे.