कथा आणि गीतगायनातून उलगडला शिवइतिहास

रत्नागिरी : शिवजन्म ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतची शिवकथा अनुभवताना शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी शिवइतिहास उभा करताना शिवरायांइतकीच किंबहुना त्याहून अधिक जिजाऊंच्या विचारांची देशाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले.

Continue reading

ब्रिटनमध्ये असलेली शिवरायांची जगदंब तलवार आणि वाघनखे महाराष्ट्राला परत मिळणार; ब्रिटिश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटनमध्ये असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अ‍ॅलन गॅम्मेल यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात १५ एप्रिलला मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Continue reading

उषा परब यांच्या मालवणी साहित्यात विविधता : गोव्यातील परिसंवादातील मत

पणजी : मराठी साहित्यात क्वचितच दिसणारी मालवणी भाषा उषा परब यांच्या नाटकातून जाणवते. मालवणी भाषेत मोजकेच लेखक लेखन करतात. मालवणी भाषेतील साहित्य विपुल प्रमाणात प्रसिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन नारायण महाले यांनी केले.

Continue reading

मालवणी म्हणजे मने जोडणारी बोलीभाषा : सुरेश ठाकूर

मालवण : ‘मालवणी भाषा ही मने जोडणारी आणि भेदभाव संपवणारी गोड अशी बोलीभाषा आहे. कोकण किनारपट्टीवर अजूनही मराठीच्या चौदा बोलीभाषा आहेत; पण मालवणी भाषेच्या गोडव्याने आणि प्रेमळ आदरातिथ्य संस्काराने या भाषेचा झेंडा आज भाषानगरीत डौलाने फडकत आहे,’ असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश श्यामराव ठाकूर यांनी व्यक्त केले.

Continue reading

अशा रंगल्या बोली-गजाली (व्हिडिओ)

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१९च्या दिवाळी अंकात घेतलेल्या बोलीभाषा कथा स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा सोहळा २९ फेब्रुवारी २०२० रोजी रत्नागिरीत पार पडला. या निमित्ताने बोली-गजाली हा अनौपचारिक गप्पांचा फड रंगला. ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर आणि संगमेश्वरी बोलीतील नामवंत लेखक गिरीश बोंद्रे यांनी आपापल्या बोलींत केलेल्या गावाकडच्या गजालींनी कार्यक्रम रंगत गेला.

Continue reading