मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा प्रारंभ आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा प्रारंभ आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाविषयी याच सदरामध्ये अनेक वेळा लिहिले आहे. अन्य सर्व माध्यमेही सातत्याने त्यावर लिहीत आहेत. दृक्श्राव्य माध्यमेही त्यात मागे नाहीत; पण निर्ढावलेली संबंधित यंत्रणा कशाचीच दखल घेत नाही, हेही स्पष्ट झाले आहे. असाच एक अनुभव हातखंब्याजवळ नुकत्याच झालेल्या अपघाताने आला. महामार्ग प्रशासनाच्या चुका आणि त्रुटींबरोबरच प्रसारमाध्यमांच्या अतिघाईमुळे झालेला मानसिक त्राससुद्धा अनुभवता आला
हातखंबा (ता. जि. रत्नागिरी) येथे आज (२८ सप्टेंबर २०२५) दुपारी दोनच्या सुमारास ह्युंडाई ग्रँड आय टेन कारचा अपघात झाला आणि ती जळून खाक झाली. गाडीतून प्रवास करत असलेले वडील आणि मुलगी बचावले आहेत; मात्र काही न्यूज पोर्टल्स आणि ग्रुप्स यांनी पोलिसांकडून शहानिशा न करता ब्रेकिंग न्यूज देण्याच्या नादात चुकीच्या तपशीलासह बातम्या प्रसारित केल्या आहेत. त्यामुळे गैरसमज दूर करण्यासाठी ही बातमी देत आहोत.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम १७ वर्षांपासून रखडले असून, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे मराठी पत्रकार परिषदेकडून आंदोलन करण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गाचं एकंदर काम ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं असून, रायगड जिल्ह्यातला माणगाव-इंदापूर भाग वगळता या महामार्गाचा प्रकल्प डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
हातखंब्यातील टँकर अपघातांच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्या बैठकीला गॅस, कंपन्यांचे प्रतिनिधी, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचे कंत्राटदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. गॅस टँकरच्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित यंत्रणांना योग्य त्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.