भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोकण टूर सर्किट सुरू

महाड : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा कोकण विभाग आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ महाड येथे झाला. या टूरमध्ये चवदार तळे आणि गांधारपाले लेण्याचे दर्शन घडविले जाते.

भारतीय लोक प्रशासन संस्थेतर्फे खुली निबंध स्पर्धा

मुंबई : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेतर्फे बी. जी. देशमुख वार्षिक खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी नेतृत्व आणि समाजात विकसित होत असलेली महिलांची भूमिका, महाराष्ट्रातील नागरी प्रशासनात झालेले बदल आणि आव्हाने हे दोन विषय आहेत.

मराठी वृत्तपत्र लेखक संघाची राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा

मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाने दिवाळी अंक स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केले आहे. संघाने आयोजित केलेली ही ४७ वी स्पर्धा आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकताय? तो गुन्हा आहे!

रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासारखी कृतीसुद्धा गुन्हाच असते. असे अनेक गुन्हे नकळत घडत असतात. त्याविषयी मंडणगडमधील वकील अॅड. यश घोसाळकर यांनी लिहिलेल्या ‘डोन्ट डू इट’ पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

‘महाडचा मुक्तिसंग्राम’ ग्रंथ समाजासाठी प्रेरणादायी – निवृत्त न्या. हेमंत गोखले

मुंबई : आपले हक्क प्राप्त करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संयमाचे दर्शन घडवणाऱ्या सत्याग्रहाची डॉ. यशवंत चवरे यांनी लिहिलेली ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ ही संघर्षगाथा समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे उद्गगार सर्वोच्च न्यायालयाच निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी काढले.

आचार्य हयात असते, तर वेगळा महाराष्ट्र दिसला असता : ज्ञानेश महाराव

मुंबई : आचार्य अत्रेंचा त्या काळातील महाराष्ट्राचा प्रगल्भ विचार आणि अग्रेसर भूमिका पाहता ते काही वर्षे जगले असते, तर वेगळा महाराष्ट्र दिसला असता, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, वक्ते चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी केले.