निसर्गाचं वर‘दान’ सांभाळू या!

अधिक (पुरुषोत्तम) मास सुरू आहे. भारतीय जीवनपद्धतीनुसार, या महिन्यात केलेल्या सत्पात्री दानाचं फळ शतपटीने अधिक मिळण्याची मान्यता आहे. इतर दानांप्रमाणे निसर्गाचं वर‘दान’रूपी सान्निध्यही मनुष्याला समाधान प्राप्त करून देतं. म्हणूनच निसर्ग सान्निध्याचा वसा आणि वारसा संवर्धित करून पुढील पिढीकडे जसाच्या तसा सुपूर्द करण्यासाठी मनुष्याने अधिक मासानिमित्ताने पावलं उचलायला हवीत. त्या निमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला हा लेख…

‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!!

करोनाचा पहिला फटका पर्यटनाला बसला. या धक्क्यातून सर्वांत शेवटी सावरणारा व्यवसायही पर्यटनच असेल. पृथ्वीवरील सर्वच ठिकाणे सुंदर होती. आपण त्या सौंदर्यांचे अभयारण्य, पार्क, कृषी पर्यटन आदी तुकडे पाडले. हे तुकडे नीट सांभाळण्याची जाणीव करोनाने करून दिली आहे. चला तर मग, आपण ‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!! रोजगार निर्मिती साधू या!!! आज (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिन. त्या निमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला हा लेख…

चक्रीवादळ अलिबागला धडकणार; रत्नागिरीतील चार हजार जणांचे स्थलांतर

रत्नागिरी/मुंबई : भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे अखेर चक्रीवादळात रूपांतर झाले असून, ते तीन जून रोजी दुपारी ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने अलिबागच्या जवळ किनाऱ्यावर धडकणार आहे. याबद्दलचा ‘ऑरेंज मेसेज’ (चक्रीवादळाची पूर्वसूचना/दक्षतेचा इशारा) हवामान विभागाने जाहीर केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या उत्तर कोकणातील जिल्ह्यांसह दक्षिण गुजरातमधील जिल्ह्यांना या वादळाचा थेट फटका बसणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहणार आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या मंडणगड, दापोली, गुहागर या तीन तालुक्यांमधील चार हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून तीन जूनला सकाळी नऊ ते दुपारी १२ या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.