अर्जुना नदीवरील पुराची माहिती आधीच मिळणार

राजापूर : नदीच्या पाण्याच्या पातळीची अपडेट देणारी रिअल टाइम डाटा अ‍ॅक्विझिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा पाटबंधारे विभागाने राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील पुलावर बसविली आहे.

श्यामची आई, शिवाजी कोण होता? पुस्तकांचे वाटप

कणकवली : येथे राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर) येथील माध्यमिक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी श्यामची आई तर प्रमुख अतिथींना शिवाजी कोण होत? हे पुस्तक भेट दिले.

राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री १५ मे २०२२ रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती संस्थानचे सचिव श्रीकांत घुगरे यांनी दिली.

दोघा छोट्या मुलींनी उघडली ज्ञानाची कवाडे

राजापूर : जुवाठी (ता. राजापूर) येथे सान्वी आणि भूमी या दोन छोट्या मुलींनी ज्ञानाची कवाडे उघडली. स्वतःसह इतर बालमित्रमैत्रिणींनाही उपयुक्त ठरणार असलेल्या गंमत जंमत बालवाचनालयाचे उद्घाटन त्या दोघींनी केले.

जुवाठी येथे १५ मेपासून आगळेवेगळे गम्मत जम्मत बालवाचनालय

राजापूर : मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी पाऊणशे वर्षे वयाच्या वाचनवेड्याने जुवाठी (ता. राजापूर) येथे आगळेवेगळे गम्मत जम्मत बालवाचनालय चालविले आहे.

सेवा दलाची पंचतत्त्वे घराघरात पोहोचावीत : शहाजीराव खानविलकर

राजापूर : सेवादलाची पंचतत्त्वे राष्ट्र सेवादल शिबिरार्थींच्या माध्यमातून घराघरात पोहोचावीत. त्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ओणी (ता. राजापूर) येथील नूतन विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक शहाजीराव भाऊराव खानविलकर यांनी मांडले.