रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील दररोज दुपारचा मेगाब्लॉक बंद करण्यात आला असून आजपासून घाटातून २४ तास वाहतूक सुरू झाली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील दररोज दुपारचा मेगाब्लॉक बंद करण्यात आला असून आजपासून घाटातून २४ तास वाहतूक सुरू झाली आहे.
राजापूर तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीने अणसुरे जैवविविधता या नावाच्या लोकजैवविविधता संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. असे संकेतस्थळ विकसित करणारी अणसुरे ग्रामपंचायत देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. त्याची दखल महाराष्ट्र राज्य जैवविविधतता महामंडळाने घेतली. आंतरराष्ट्रीय जैवविविधतता दिवसाचे औचित्य साधून अणसुरे ग्रामपंचायतीचा विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारी ग्रामपंचायत म्हणून गौरव केला. त्यानिमित्ताने या गावाने राबविलेल्या प्रयोगाविषयी.
चिपळूण : येथील दिशान्तर सामाजिक संस्थेने घेतलेल्या पुढाकारातून खांदाट (ता. चिपळूण) येथील वैतरणा नदीवर पाच कोटी लिटर क्षमतेच्या सिमेंट काँक्रीट बंधार्याची निर्मिती करण्यात आली आहे.
रत्नागिरी : दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत आयुष शिर्के आणि अवनी आशिष घाणेकर यांनी सोडतीतून सायकली जिंकल्या. याशिवाय विजेत्या स्पर्धकांना १० सायकल हेल्मेट आणि इतर अनेक बक्षिसे सोडतीतून वाटण्यात आली.
मालवण : ‘मालवणी भाषा ही मने जोडणारी आणि भेदभाव संपवणारी गोड अशी बोलीभाषा आहे. कोकण किनारपट्टीवर अजूनही मराठीच्या चौदा बोलीभाषा आहेत; पण मालवणी भाषेच्या गोडव्याने आणि प्रेमळ आदरातिथ्य संस्काराने या भाषेचा झेंडा आज भाषानगरीत डौलाने फडकत आहे,’ असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश श्यामराव ठाकूर यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या रविवारी (दि. २२ मे) सकाळी ६ वाजता रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे शहरांतर्गत सायकल प्रसार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.