सर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग २ – आर्थिक

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण सावरकरांचे सामाजिक इम्युनिटीबद्दलचे विचार पाहिले. आजचा दुसरा भाग आर्थिक इम्युनिटीबद्दलच्या विचारांचा…

सर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक

गेली दोन वर्षं शारीरिक इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्तीवर जगभर प्रचंड चर्चा होते आहे. १०० वर्षांपूर्वीच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे विचार मांडले होते, त्यातून त्यांनी देशबांधव आणि भगिनींच्या शारीरिक, मानसिक इम्युनिटीसह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक इम्युनिटीचाही विचार केला होता, हे जाणवतं. रत्नागिरी ही सावरकरांची कर्मभूमी. त्यांच्या रत्नागिरी प्रवेशाला २०२१मध्ये १०० वर्षं पूर्ण झाली. २८ मे रोजी सावरकरांची जयंती आहे. तसंच, सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. या औचित्याने, सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणारी ही लेखमाला… आजचा पहिला भाग सामाजिक इम्युनिटीबद्दलचा…

सावरकरांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेचे : राज्यपाल कोश्यारी

रत्नागिरी : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतातील जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (२५ ऑक्टोबर) केले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नवी दिल्लीच्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेतर्फे (आयसीएचआर) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सावरकर राष्ट्रीय स्मारकाची अभ्यासकांसाठी पर्वणी

स्वा. सावरकरांशी संबंधित समकालीन देशी-परदेशी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधील वृत्ते-लेखांचा संग्रह करण्याचा प्रकल्प स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे साकारला जाणार आहे. अभ्यासकांसाठी ती पर्वणीच ठरणार आहे.