करोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार

रत्नागिरी : करोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना २५ हजार ते दोन लाखापर्यंतचे सन्मान पुरस्कार रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. अशा तऱ्हेने पुरस्कार जाहीर करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ रुग्णांची वाढ; रत्नागिरीची रुग्णसंख्या २०८वर

आतापर्यंत करोना रुग्णांची संख्या मर्यादित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या करोनाबाधितांच्या संख्येत आज (२९ मे) एकदम १५ रुग्णांची वाढ झाली. २८ मे रोजी रात्री सहा, तर २९ मे रोजी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३९ झाली असून, ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २९ मे) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये १२ करोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०८ झाली आहे. रत्नागिरीतील करोनाबाधित गावांची यादीही आज जाहीर करण्यात आली.

समन्वयाच्या अभावाचे चटके अधिक

राज्य पातळीवर समन्वयाच्या अभावाची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. जिल्हा पातळीवरसुद्धा हाच समन्वयाचा अभाव झिरपला आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील.

रत्नागिरीत १२ करोनाग्रस्त वाढले; संख्या १९५वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत आज (२७ मे) १२ रुग्णांची भर पडली आहे. सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये हे स्पष्ट झाले. दरम्यान, आज पाच विद्यार्थिनींना करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले.

सावंतवाडी तालुक्यात क्वारंटाइन तरुणाचा मृत्यू; कारण अस्पष्ट

सावंतवाडी : क्वारंटाइन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही घटना घडली. मुंबईतील मालाडहून कालच (२६ मे) आपल्या गावात आलेला हा तरुण शाळेत क्वारंटाइन होता. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. या मृत युवकाचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरीची रुग्णसंख्या १८३वर; नवे आठ करोनाबाधित सापडले

रत्नागिरी : काल रात्री (२६ मे) उशिरा आलेल्या अहवालांनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात आणखी आठ करोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १८३वर पोहोचली आहे. या आठपैकी सहा जण रत्नागिरीतील, तर दोन जण संगमेश्वरातील आहेत. रत्नागिरीतील सहा जणांपैकी चार जण रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल आहेत.