रत्नागिरी : आज (२२ मे) रोजी मिरज येथून आलेल्या तपासणी अहवालांपैकी सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ४५५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३२ झाली आहे. त्यापैकी ९१ रुग्णांवर उपचार सुरू असून, ३७ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.