राज्यात बंदी आदेश लागू; अधिसूचनेतील नियम जाणून घ्या

कोविड-१९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मार्च २०२०पर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेतील नियम जाणून घ्या…

आता फक्त दुचाकींनाच आणि ठरलेल्या वेळेतच पेट्रोल मिळणार

राज्यात २३ मार्च २०२०पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांना पेट्रोल, डिझेलच्या पुरवठा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Representational

रत्नागिरीसह जिल्ह्यातील नऊ शहरांत दुचाकीवरून एकट्यालाच जाता येणार

करोनाच्या प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी नागरी (शहरी) भागांसाठी आहे. रत्नागिरीसह खेड, चिपळूण आणि राजापूर, नगरपालिकांचे क्षेत्र, तसेच मंडणगड, दापोली, गुहागर, देवरूख आणि लांजा या नगरपंचायतीच्या क्षेत्रांमध्येही जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या सर्व शहरांमध्ये दुचाकीवरूनही एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. दुचाकीवर दुसरी व्यक्ती दिसली, तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला शिक्षा केली जाईल.

कलम १४४ : काय करावे, काय करू नये? रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

‘२२ मार्चच्या मध्यरात्रीपासून राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात करोना संसर्ग टाळण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू झाले आहे. आता प्रत्येकाने स्वत: व स्वत:च्या कुटुंबासाठी प्रशासनाला सहकार्य करून कलम १४४ची प्रभावी अंमलबजावणी करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

या कालावधीत काय करावे, काय करू नये, कोणत्या सेवा सुरू, कोणत्या सेवा बंद राहणार आहेत, याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती..

'करोना'शी लढा : मानसिक आरोग्य उत्तम कसे राखाल? : डॉ. आनंद नाडकर्णी यांचा व्हिडिओ

सध्या सर्वत्र फक्त ‘करोना’ आणि ‘करोना’ एवढंच ऐकू येतं आहे, तेच वाचायला मिळतं आहे, दिसतं आहे… त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात भीतीचं वातावरण आहे. शिवाय सगळे व्यवहार बंद असल्याने ‘पुढे काय होणार’ याचं टेन्शनही आहे; पण या परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देता मानसिक आरोग्य उत्तम राखण्याची गरज आहे. ते कसं राखायचं याचं मार्गदर्शन ख्यातनाम मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी एका छोट्या व्हिडिओतून केलं आहे. त्यांचे शब्द सध्याच्या कठीण परिस्थितीत प्रत्येकाच्या मनाला उभारी देतील आणि संकटातून बाहेर पडण्याची मानसिक शक्ती देतील. तो व्हिडिओ येथे देत आहोत.

क्वारंटाइन म्हणजे काय रे भाऊ?

कोरोना या विषाणूची साथ आल्यापासून पॅन्डेमिक, इन्क्युबेशन पीरियड, आयसोलेशन, क्वारंटाइन हे शब्द वारंवार ऐकू येत आहेत. या ‘मेडिकल टर्म्स’मुळे सामान्य माणूस गोंधळून गेला आहे. विशेषतः क्वारंटाइन हा शब्द दहशतीसारखा वाटतो आहे; पण कुठलीही साथ आटोक्यात आणण्याकरिता क्वारंटाइनसारखा उत्तम पर्याय नाही याबद्दल दुमत नाही. या शब्दामागची भिती, दहशत कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट करणारा, बाल आरोग्य संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर दाभाडकर (महाड) यांनी लिहिलेला हा लेख…