पाचाचे पन्नास करताना …

रत्नागिरीत नुकत्याच सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशक्षमता शंभर विद्यार्थ्यांची असून आता प्रवेश घेतलेल्या शंभर विद्यार्थ्यांपैकी चार रत्नागिरी जिल्ह्यातले आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अशा कोकणातल्या पाच टक्के विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घेतला आहे. ही प्रवेश संख्या पन्नास टक्क्यांपर्यंत जावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी या समारंभात व्यक्त केली, ती योग्यच आहे. पण त्यासाठी अनेक मुद्दे विचारात घेतले जायला हवेत.

Continue reading

तासभर स्वच्छता, बाकी आनंदच!

वाहने सुरक्षितरीत्या चालविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या वाहतूक विभागाने आणि पोलिसांनी रस्त्यावरच्या मोकाट गुरांची जबाबदारीही स्वीकारलीच पाहिजे. ही समस्या कशी सोडवायची हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. तो त्यांनी सोडविला नाही, तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हे आणि तक्रारी दाखल झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही. या तक्रारी दाखल करण्याचे काम सर्वसामान्य वाहनचालक नागरिकांनी करायला हवे.

Continue reading

वाहतूक विभागाची जबाबदारी

वाहने सुरक्षितरीत्या चालविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या वाहतूक विभागाने आणि पोलिसांनी रस्त्यावरच्या मोकाट गुरांची जबाबदारीही स्वीकारलीच पाहिजे. ही समस्या कशी सोडवायची हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. तो त्यांनी सोडविला नाही, तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हे आणि तक्रारी दाखल झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही. या तक्रारी दाखल करण्याचे काम सर्वसामान्य वाहनचालक नागरिकांनी करायला हवे.

Continue reading

गणेशोत्सवाची महिलांना भेट

महिला आरक्षणाचा श्रीगणेशा होऊन बराच काळ लोटला. आता त्याला नवे बळ मिळाले आहे. या संधीचा स्वीकार आणि अंमलबजावणी महिलांनी मात्र कसोशीने करायला हवी. त्यासाठी आग्रही राहायला हवे. कायदा झाल्यानंतर महिला उमेदवार निवडणे आणि त्यांचे प्रशिक्षण यासाठीही प्रयत्न करायला हवेत. तरच नव्या कायद्याला अर्थ प्राप्त होणार आहे.

Continue reading

रेल्वे-एसटी करार, प्रवासी वाऱ्यावर

रेल्वे आणि एसटीच्या तिकिटांसाठी झालेल्या सामंजस्य करारापेक्षाही रेल्वेने येणारे प्रवासी हे एसटीचेही प्रवासी आहेत, अशा सामंजस्याच्या भूमिकेने एसटीने सेवा उपलब्ध करून दिली, तर प्रवाशांना त्याची अधिक आवश्यकता आहे. मनमानी भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांना त्यामुळे चाप तर बसेलच, पण एसटीच्या उत्पन्नातही चांगली वाढ होऊ शकेल.

Continue reading

अंकुरलेले साहित्यबीज

बीज अंकुरे अंकुरे नावाचे पुस्तक कोमसाप-मालवण शाखेच्या पुढाकाराने नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ मालवण येथे झाला. मधुभाईंनी म्हटल्याप्रमाणे कोकणात साहित्याची बीजे ठिकठिकाणी आहेतच. तिला पूर्ण दिशा दाखविण्याचे काम कोणीतरी करायला हवे आहे. हे काम कोमसाप-मालवण शाखेचे अध्यक्ष आणि पुस्तकाचे संपादक सुरेश ठाकूर यांनी चांगल्या पद्धतीने निभावले आहे.

Continue reading

1 2 3 4 29